कोकण

अॅग्रिस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र बंधनकारक

CD

विमा योजनेतील सहभागासाठी
शेतकरी ओळखपत्र बंधनकारक
रत्नागिरी, ता. ३० ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२५-२६ या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक केला आहे. ज्या आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरिता अॅग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी पूर्ण करावी अशे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत आंबिया बहार २०२५-२६ मध्ये आंबा व काजू या फळपिकांसाठी राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या शासन निर्णय ११ एप्रिल २०२५ नुसार व १५ मे २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनान्वये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तसेच महा ई सेवा केंद्र आणि कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरु असल्याने त्यांचेशी संपर्क करून नोंदणी करावी, असे सदाफुले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

SCROLL FOR NEXT