कोकण

रत्नागिरी- २ ऑगस्टला व्यवहार बंद राहणार

CD

टपाल कार्यालयाचे व्यवहार
दोन ऑगस्टला बंद राहणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डीजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी अॅप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. यासाठी २ ऑगस्टला एक दिवस टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी आवश्यक सेवेचे नियोजन त्याप्रमाणे करण्याचे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.
येत्या ४ ऑगस्टला रत्नागिरी डाक विभागातील दोन्ही प्रधान डाकघरे रत्नागिरी व चिपळूण आणि त्या अंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये, शाखा डाकघरांमध्ये नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. एपीटीचा उद्देश हा सुधारित वापरकर्ता अनुभव, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही सेवा प्रदान करणे हा आहे.
नव्या प्रणालीमुळे व्यवहार जलद, अचूक व ग्राहकाभिमुख होणार असल्याचा विश्वास रत्नागिरीच्या डाकघर अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यासाठी प्रणाली पडताळणी व संरचना प्रक्रिया २ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी टपाल कार्यालयाचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: ४० वर्षांची सोबत संपली! नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या नेण्यामागची संपूर्ण कहाणी; अखेर भावनेपेक्षा पैसा मोठा ठरला!

Pune : मुलाचा खेळताना मित्रांशी वाद, नेत्याच्या पुतण्याचा राडा; अल्पवयीनाच्या पोटात घातली लाथ, VIDEO VIRAL होताच अटक

Latest Maharashtra News Updates : पोलिसांना विचारणे आहे की रेव्ह पार्टी म्हणजे काय?

Stock Market Opening: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

IND vs ENG 5th Test: इंग्लंडच्या संघात 'तो' परतला; टीम इंडियाला पाचव्या कसोटीत 'वेगवान' माऱ्याने हैराण करणार

SCROLL FOR NEXT