कोकण

रत्नागिरी-महामार्गाला पुन्हा डिसेंबर २०२५ची डेडलाईन

CD

‘डेडलाईन’ न पाळल्यास ठेका रद्द

शिवेंद्रसिंहराजे भोसले; महामार्गाचे काम गांभीर्याने घेण्याचे आदेश

* अपूर्ण कामांसाठी स्वतंत्र २०० कोटींचा प्रस्ताव
* मार्गावरील पुलांना जानेवारी २०२६ ची मुदत
* महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण

रत्नागिरी, ता. ८ : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली सोळा वर्षे रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देशातील एकूण प्रकल्पांमधील हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता डिसेंबर २०२५ पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. ठेकेदरांनी हे गांभीर्याने घ्यावे; अन्यथा ठेका रद्द करून दुसरा ठेकेदार नेमण्यात येईल, अशी ताकीद गडकरींनी दिली आहे. त्यामुळे काही झाले तरी यावेळी डेडलाईन पाळली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भोसले म्हणाले महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे, तसेच या मार्गावरील अनेक कामे पूर्ण करण्यासाठी २०० कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव आम्ही शासनाला दिला आहे. यावेळी शिवसेनेचे राजापूरचे आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. भोसले म्हणाले, गुरुवारपासून मी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत आहे. अनेक ठिकाणी कामे प्रगतिपथावर आहेत. जवळपास ९० टक्के चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. संगमेश्वर ते हातखंबा या टप्प्याचे काम शिल्लक राहिले आहे. याबाबत आम्ही गांभीर्याने घेतले आहे, तशी ताकीद ठेकेदारांना दिली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या टप्प्यातील काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. पहिला ठेकेदार आणि आता नियुक्ती केलेल्या ठेकेदारामध्ये आर्थिक विषयातील तिढ्यामुळे या कामाला गती मिळाली नाही; परंतु याबाबत ठेकेदाराला योग्य सूचना केली आहे. कामात दिरंगाई केल्याबद्दल त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे आणि पुढेही होत राहणार आहे. यावेळी डिसेंबर २०२५ ही दिलेली डेडलाईन हुकणार नाही. माणगाव ते इंदापूर या बायपास रस्त्याला मात्र उशीर होणार आहे. उर्वरित रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल.
चिपळूण पुलाचे कामदेखील जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. हे पूल कोसळल्यामुळे त्याच ठेकेदाराकडून एक पैसा न देता हे काम करून घेतले जात आहे. उर्वरित बावनदी, संगमेश्वर येथील पुलांची कामेदेखील जानेवारीपर्यंत होतील. महामार्गावरील अनेक कामे पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र २०० कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये सर्व्हिस रोड, पार्किंग व्यवस्था, ब्लॅकस्पॉट, उड्डाणपूल आदी कामे घेतली जाणार आहेत. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसे दिसले तर तत्काळ ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री भोसले यांनी दिला.
-----------
चौकट...
मार्चपर्यंत ठेकेदारांचे दिले साडेनऊ हजार कोटी
जिल्ह्यातील विविध विकासकामांचे ठेकेदारांचे शासनाकडून सुमारे २०० कोटी रुपये येणे आहे. ठेकेदार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत, यावर उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले, मार्चपर्यंत राज्यातील ठेकेदारांचे सुमारे साडेनऊ हजार कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित राहिला निधी येत्या आठवडाभरात वितरित केला जाईला. त्यामुळे ठेकेदारावर शासन अन्याय करत आहे असे काही नाही. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कोणताही परिणाम विकासकामांवर झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Killed Hamas Commanders : इस्रायली सैन्याने घेतला ७ ऑक्टोबरचा बदला; हमास दहशतवादी संघटनेच्या टॉपच्या पाच कमांडर्सचा केला खात्मा!

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम!, जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

PM Modi and Vladimir Putin: पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना केला फोन अन् 'या' मुद्य्यावर झाली चर्चा!

Chandrashekhar Bawankule : राज्यातील 45 लाख शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष शेतातील विजपंपाचे बील भरावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT