अंबड - आमच्या महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या काळात संकल्प केला होता की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजपंप आहे. अशा शेतकऱ्याना पुढील पाच वर्ष वीज पंपाचे बील येणार नाही. यामध्ये चांद्यापासून ते बांध्यापर्यंत, जालना पासुन नागपूर व कोल्हापूर पासुन ते सिन्दुर पर्यंतच्या शेतकऱ्याला बील भरण्याची गरज भासणार नाही.