कोकण

-''सकाळ''चे रवींद्र साळवींचा गौरव

CD

-rat१६p३३.jpg-
25N84981
रत्नागिरी ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रवींद्र साळवी यांचा गौरव करण्यात आला. शेजारी मान्यवर
---
शेतकरी रवींद्र साळवी यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १८ ः लांजा तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी व बातमीदार रवींद्र साळवी यांनी भातपिक स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रवींद्र साळवी यांचा १५ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत लांजा तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी व ‘सकाळ’चे बातमीदार रवींद्र साळवी यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुवर्णा मिलिंद वैद्य (रीळ), महेंद्र विठ्ठल पवार (गुडेघर, मंडणगड) यांनी पटकावला. रवींद्र साळवी यांनी १ गुंठ्यामध्ये ११७.५० किलो भाताचे उत्पादन घेतले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, रोटरीचे प्रमोद कुलकर्णी, ॲड. स्वप्नील साळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT