नवीन घरांना ग्रामपंचायतीतून
परवानगी मिळावी : सुनील दळवी
राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ : ग्रामपंचायत अखत्यारित असलेल्या नवीन घरांसाठीची बांधकाम परवानगी पूर्वीप्रमाणेच मिळावी, अशी मागणी कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य सुनील दळवी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली. तसे निवेदन त्यांना देण्यात आले.
शासनाच्या काही नियमांचा ग्रामीण भागातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य माणूस अशा नियमांची पूर्तता करताना मेटाकुटीस येत आहे. गावात नवीन घर बांधताना काही परवानग्या घेण्यासाठी होणारा त्रास आणि जाणारा पैसा यामुळे नवीन घर बांधू नये, अशीच स्थिती आहे. शासनाचे घरकुल बांधताना कोणतीही नवीन परवानगी लागत नाही; मात्र स्वखर्चाने घर बांधायचे म्हटले की, परवानग्या घ्याव्या लागतात. घर बांधले तरी ते अनधिकृत म्हणून पावती दिली जाते. हीच बाब कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी परिषदचे सदस्य सुनील दळवी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे. यावर मंत्री कदम यांच्याबरोबर चर्चाही केली. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींतर्गत घरांना परवानगी मिळावी याबाबत अधिवेशनामध्ये मागणी करण्याची विनंती केली. नगरपालिका, महानगरपालिकांना असणारे नियम ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला न लावता नवीन घर बांधताना ग्रामपंचायतींना पूर्वीसारखेच नियमांचे पालन करून परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.