Water Supply Of 14 Villages In Ratnagiri Will Stop Any Time  
कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा गावांचे पाणी कोणत्याही क्षणी बंद; कारण काय? 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - सुमारे 14 ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. योजनेची पाणीपट्टी 94 लाख असताना फक्त 2 लाख म्हणजे अवघे 2 टक्के वसुली झाली आहे. जिल्हा परिषदेनेही पाणीपट्टी भरण्यास नकार दिल्याने थकबाकीवरून महावितरण कंपनी कधीही वीज जोडणी तोडण्याची शक्‍यता आहे. 

एक नजर

  • जिल्हा परिषदेचे पाणीपट्टीबाबत हात वर 
  • पाणीपट्टी वाढ आणि थकबाकीचा वाद 
  • वीज जोडणी तोडण्याची शक्‍यता 
  • 14 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक 

पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये हे सत्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने उघड केले. गेले काही दिवस जयगड प्रादेशिक पाणी योजनेच्या पाणीपट्टी वाढीवरून आणि थकबाकीचा वाद सुरू होता. पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्यास नकार दिला होता. पाणीपट्टी न भरल्याने पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा जिल्हा परिषदेने दिला होता. त्यानंतर पाणीपट्टी कमी करून काही महिने सामोपचाराने 14 ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा सुरू होता. मात्र आजच्या बैठकीमध्ये योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचे स्पष्ट झाले. 

थकीत वीजबिलामुळे योजना पडणार बंद

सभागृहात संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले, जयगड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला महिन्याला साधारण तीन लाखाच्या दरम्यान वीजबिल येते. वर्षाची पाणीपट्टी सुमारे 94 लाख आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टीतून हे बील भरले जाते. मात्र आतापर्यंत फक्त 2 लाख रूपये बिल भरण्यात आले. म्हणजे केवळ 2 टक्के पाणीपट्टी वसूल झाली. जिल्हा परिषदेनेही वीजबिल भरण्यास नकार दिल्याने थकीत वीजबिलामुळे ही योजना कधीही बंद पडण्याची शक्‍यता आहे. 

सरपंचांची लवकरच बैठक 

नोव्हेंबर अखेर फक्त 2 टक्के पाणीपट्टी वसूल झाल्याने 14 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची बैठक बोलावण्याचा निर्णय पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये पाणीपट्टी वसूल करून योजना बंद पडणार नाही याची खबरदारी घेऊ असा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सदस्य गजानन पाटील यांनी व्यक्त केले. त्याला सभापती पाटील यांनी संमती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT