Anand Mahindra share the message Don’t mess with the women of India indias
Anand Mahindra share the message Don’t mess with the women of India indias  sakal
क्रीडा

'भारतीय महिलांना कमी लेखू नका'; आनंद महिंद्राकडून मीराबाईचे अभिनंदन

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं असून एकूण 201 किलोग्राम वजन उचलत तिने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी कॉमनवेल्थ गेम्स मधील वेटलिफ्टर मीराबाई चानूचा एक व्हिडिओ शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. महिंद्राने ट्विट करत लिहिले की, भारतीय महिलांना कमी लेखू नका. 27 वर्षीय खेळाडूने CWG मध्ये एकूण 201 किलो वजन उचलून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

मीराबाईने यावेळी क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर स्नॅच राऊंडमध्ये 88 किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे मीराबाईने एकूण (113+88) 201 किलोग्राम वजन उचलत एक दमदार असा रेकॉर्ड करत मीराबाईने गोल्ड जिंकवून दिलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या मीराबाईकडून कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाचीच अपेक्षा होती, जी तिने पूर्ण करत भारतासह स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT