cricket
cricket 
क्रीडा

World Cup 2019 : भारताची विजयाकडे कूच; पाकच्या दांड्या गुल

वृत्तसंस्था

मँचेस्टर : बाबर आझम आणि फखर झमान यांची शतकी भागीदारीने भारतीयांच्या मनात थोडी हुरहूर सुरु असतानाच चायनामन कुलदीप यादवची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्यानंतर जणू काही सामन्याचे चित्रच बदलले अन् पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियन परतला.

गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा घेतलेला अपेक्षित निर्णय भारतीय फलंदाजांनी त्यांच्यावरच उलटवला. रोहित शर्माचे तडाखेबंद शतक, कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल यांची अर्धशतके या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या. पाकिस्तानचे हुकमी अस्त्र असलेल्या महंमद अमीरने शेवटच्या टप्प्यात टिच्चून मारा करून तीन फलंदाजांना बाद केले म्हणून धावफलकाला थोडातरी आळा बसला. 

भारताच्या या आव्हानासमोर पाकिस्तानची सुरवात खराब झाली. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर सलामीवीर इमाम उल हक याला विजय शंकरने पायचीत बाद केले. त्यानंतर फखर झमानच्या मदतीला आलेल्या बाबर आझमने भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत शतकी भागीदारी नोंदविली. पाकिस्तान लक्ष्याकडे जात असताना कुलदीपची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्याने बाबरचा त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ फखरचा अडखळाही कुलदीपने हटविला. हार्दीक पंड्याने मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक यांना एकाच षटकाच बाद करून पाकिस्तानची अवस्था 5 बाद 139 अशी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT