Janmashtami 2023
Janmashtami 2023 esakal
लाइफस्टाइल

Janmashtami 2023 : कोल्हापुरातल्या या गावात वर्षातून दोनवेळा साजरी होते दहीहंडी; गावात श्रीकृष्णांनी केला रंभेचा उद्धार!

Pooja Karande-Kadam

Janmashtami 2023 : श्रीकृष्णांची मंदिरे जशी भारतात आहेत तशी ती परदेशातही आहेत. कृष्णभक्तीचा प्रसार जगभर झाला आहे. अनेक देशात कृष्णांचे भक्त आहेत. दरवर्षी भारतात असलेल्या इस्कॉन मंदिरात परदेशातील भाविकही येतात. नाचतात गातात कृष्णभक्तीत तल्लीन होतात.

जगतकल्याणासाठी देव मनुष्यरूपात जन्म घेतात. देव असूनही यशोदामातेचा मार खातात, गोपिकांचे दही चोरतात. प्रसंगी गोवर्धन उचलून प्रजेचे रक्षण करतात. आणि जगतकल्याणासाठी भ्रमण करतात. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण भक्तांसाठी आज जणू दिवाळी अन् दसरा होय.

कृष्णाने अनेक ठिकाणी जाऊन राक्षसांचा वध केला. गावांचा, लोकांचा उद्धार केला. तसेच ते एकदा करवीर क्षेत्राकडे आल्याचे उल्लेख पुराणांमध्ये आहेत. या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात.

करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आढळतो.

जावयाचा वध केला म्हणून बदला घेण्यासाठी कंसाचे सासरे जरासंधाने कृष्णाला मारण्यासाठी कालयवन या राक्षसाला पाठवले होते. कालयवन हा जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती होता. लेकीच्या पतीची हत्या केली म्हणून जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले होते. सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले. अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले.

हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे. अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. (Lord Krishna)

भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला. कालयवनाला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे. यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी असे केले कारण त्या राक्षसाला मथूरेपासून दूर न्यायचे होते.

सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये दैत्याला आव्हान दिले. श्रींचा पाठलाग करत दैत्य कोल्हापुरजवळच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरला. मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल.भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली. आणि तो जळून भस्म झाला.

करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचाचा उद्धार केला. तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले. तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे. (Janmashtami)

जाखले मंदिरातील सभामंडप

आजही जाखले गावात हे गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले.

जाखले गावातील ग्रामस्थ लक्ष्मण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाखले गावात गोपालेश्वर हे मंदिर आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की, मोकळ्या माळावर एका निर्जनस्थळी महादेवांचे शिवलिंग होते. ते कोणालाच माहिती नव्हते. माळरानावर असंख्य गायी चारण्यासाठी गोपाळ यायचे. तेव्हा गोपाळांनी आणलेल्या गायी महादेव असलेल्या जागी जाऊन पान्हा सोडत होत्या. त्या दुधाने महादेवांना अभिषेक करायच्या.

गायींचे असे पान्हा सोडणे आश्चर्यजनक होते. त्यामुळे त्याजागी शोधले असता तिथे महादेवांची पिंड असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्या शिवलिंगाच्या जागी मंदिर उभारण्यात आले.

मंदिरातील गाभाऱ्यातील शंकरांची मूर्ती आणि शिवलिंग

करवीर महात्म्यात श्रीकृष्णांनी जाखले या गावचा उद्धार केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळेच या मंदिरात कृष्णांचा जन्मकाळ सोहळा होतो. यानंतर गावात दहीहंडी असते. तर दिवाळीत येणाऱ्या तुलसी विवाहानंतर या गावची यात्रा असते. तेव्हाही या गावात दहीकाला साजरा होतो. यात्रेवेळी देवांची पालखी जेव्हा गावातील पारावर येते.

तेव्हा तिथे असलेल्या मोठ्या झाडाला दह्याने भरलेली हंडी बांधली जाते. देवांची पालखी झाडाखाली आली की, दह्याने भरलेली हंडी फोडून पालखीवर अभिषेक होतो. वर्षातून दोनवेळा दहीहंडीचा उत्सव या गावातील भक्तांना अनुभवता येतो.

जाखले गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम गोपालेश्वर मंदिर तसेच मानेवाडा येथे परंपरागत चालू आहे तसेच दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा वैकुंठ चतुर्थी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी गावामध्ये चौगुले कदम समाजातर्फे साजरा केला जातो

( संबंधीत लेख इतिहास संशोधन ॲड.प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीवरून घेतला आहे)

गावातील तुलसीविवाह अन् पालखी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT