Raksha Bandhan 2024  esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन साजरे करण्याला प्रारंभ कधीपासून झाला, या पौराणिक कथा सांगतात बरंच काही...

रक्षाबंधनाचा सण कधीपासून साजरा करण्यास सुरूवात झाली याबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Raksha Bandhan 2024 :

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दिवस असलेला रक्षाबंधनाचा पवित्र सण आज आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. रक्षाबंधनाचा सण हा सर्वांचाच आनंद द्विगुणीत करणारा आहे.

रक्षाबंधनाचा सण कधीपासून साजरा करण्यास सुरूवात झाली याबद्दलच्या अनेक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथांनुसार बहिणीचे रक्षण ज्यांनी केले ते त्यांचे बंधू झाले. द्रौपदीचे बंधू शोभले नारायण हे काव्य यावरूनच समर्पित आहे.

राखी म्हणजेच रक्षाला पूर्वीच्या काळी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. हे संरक्षण सूत्र नंतर नवरा बायको, आई-मूल आणि नंतर भाऊ बहिण यांच्या प्रेमाचे प्रतीक बनले. तर रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे

महाभारतातील रक्षाबंधन

रक्षाबंधनाशी संबंधित महाभारतकालीन गोष्ट सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. यामुळे रक्तस्राव थांबला.

कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले, असे सांगितले जाते. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला रक्षाबंधन साजरे करावे, असे सल्ला दिला होता, अशी आख्यायिका आहे.

शची देवीचे रक्षाबंधन

देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले, तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतींकडे गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशीम धागा बांधला.

परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.

लक्ष्मी देवी आणि रक्षाबंधन

स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवतेनुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार घेऊन राजा बलिकडे तीन पाऊले जमीन मागितली. त्यावेळी राजा बलीनेही भगवंतांकडून दिवस-रात्र आपल्यासमोर राहण्याचे वचन घेतले.

वामनावतारानंतर श्रीविष्णूंना पुन्हा लक्ष्मी देवीकडे जायचे होते. पण श्रीविष्णू वचनात बांधले गेल्यामुळे पातालात राहून बलीच्या सेवेत राहू लागले. अनेक दिवस झाले, तरी श्रीविष्णू लक्ष्मीकडे परतले नाही म्हटल्यावर लक्ष्मी देवी काळजीत पडल्या.

नारदाने लक्ष्मी देवींना एक उपाय सांगितला. तेव्हा लक्ष्मी देवीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनविले. श्रीविष्णूंना आपल्यासोबत नेण्याचे वचन बली राजाकडून लक्ष्मी देवीने मागितले. तसेच वर्षातील चार महिने श्रीविष्णू पाताळात येऊन आपल्याला दिलेल्या वचनाचा मान ठेवतील, असेही लक्ष्मी देवींनी बली राजाला सांगितले.

हाच कालावधी चातुर्मास म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी देवींनी राजा बलीला रक्षासूत्र बांधले, तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT