Loksabha 2019

Loksabha 2019 : अब की बार.. 282 पार : भाजपचा आत्मविश्वास!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय होईल आणि 282 हून अधिक जागा पक्षाला मिळतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच आता एनडीएच्या विजयी उमेदवारांची संख्याही वाढेल, असेही ते म्हणाले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, मागील निवडणुकीपेक्षा 2019 च्या निवडणुकीत भाजपचा जास्त जागांवर विजय होईल. फक्त आम्हीच नाहीतर एनडीएतील घटक पक्षांच्या जागाही वाढणार आहेत. तसेच भाजपला जनता का मत देईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्याने अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आता आम्हाला असे वाटते, की त्यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा नवे सरकार सत्तेवर येईल. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सर्व बाबी लक्षात घेऊन विकासाच्या दृष्टीने पावले उचलली.

दरम्यान, काँग्रेसकडून सहा सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली गेली असा दावा केला गेला. त्यावर अमित शहा म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशिवाय अन्य कोणीही बोलत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

SCROLL FOR NEXT