Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदी सरकारकडून जनतेवर अन्याय : राहुल गांधी

वृत्तसंस्था

डुंगरपूर (राजस्थान) : गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने भारतातील जनतेवर अन्यायच केला आहे. मात्र कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर देशात पुन्हा न्यायाचे राज्य येईल, असा विश्‍वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला. 

आदिवासी बहुल डुंगरपूर मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ बेनेश्‍वर धाम येथे आज आयोजित सभेत राहुल बोलत होते. ते म्हणाले, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. त्यांनी केवळ पंधरा ते वीस जणांसाठी सरकार चालवले. मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगाराचे आश्‍वासन दिले होते, पंधरा लाख खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले होते, तसेच पिकांना चांगला हमीभाव मिळेल, असेही आश्‍वासन दिले होते.

मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. देशातील वंचित घटक, गरीब, आदिवासी, मागासर्वीय, गरिबांवर मोदी सरकारने अन्यायच केला आहे. तो अन्याय दूर करणार असल्याचे राहुल यांनी सांगितले. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी बेनेश्‍वर धाम येथील शिवमंदिरात जावून दर्शन घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT