Rahul Gandhi and Abhijit Pawar
Rahul Gandhi and Abhijit Pawar 
Loksabha 2019

RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल गांधी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार?

उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना तोंड देत आहे. येथे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत, रोजगाराची समस्या आहे, आर्थिक पेच आहेत. हे तिन्हीही एकमेकांत गुंतलेले आहेत. ज्या पंतप्रधानांनी पदावर पाच वर्षे काढताना केवळ टोलवाटोलवीच केली, या समस्यांवर तोडगाच काढला नाही, त्यांनी विचार करावा, हे का घडले? गेल्या ४५ वर्षांत आपल्याकडे रोजगार का घटला? याचे तरी जनतेला उत्तर द्यावे. छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांची वाढ का खुंटली? देशात एकमेकांविरोधात एवढे टोकाचे ध्रुवीकरण का झाले? जम्मू-काश्‍मीरमध्ये लोक एवढ्या मोठ्या संख्येने मृत्युमुखी का पडत आहेत, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी द्यावीत.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT