Loksabha 2019

Loksabha 2019 : 'आम्ही राहुल गांधींचा पराभव करू'

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : राहुल गांधी यांनी भाजपला नाही तर डाव्यांना पराभूत करण्यासाठीच वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांचा सामना थेट आमच्याशीच होणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना वायनाडमधून पराभूत करू, असा इशाराच केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी आज (रविवार) दिला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर डाव्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर आता विजयन यांनी सांगितले, की भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचे भासवत राहुल गांधी यांनी स्वत:ची उमेदवारी देऊन त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. तसेच केरळमधील लोकसभेच्या 20 जागांपैकी काँग्रेस एकाच जागेवर निवडणूक लढवत आहे, त्यामुळे याकडे कोणतेही दुर्लक्ष करता येणार नाही.

दरम्यान, केरळमध्ये जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथेच राहुल गांधी यांनी निवडणूक लढवायची होती. मात्र, त्यांनी असे न करता वायनाडमधून निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा हा सामना डाव्यांविरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे, असे विजयन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT