महाराष्ट्र

उदयनराजेंच्या साताऱ्यातील भाषणातले ‘हे’ दहा मुद्दे महत्त्वाचे

सकाळ डिजिटल टीम

सातारा : पंधरा वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. पण, सत्तेत असूनही माझी कामं झाली नाही. काही लोकांनी माझा बँड वाजवायचा प्रयत्न केला. पण, हे लक्षात ठेवा की माझा बँड मीच वाजवू शकतो, असा टोला भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सातारा येथे पोहोचली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी जाहीर सभेत मनोगत व्यक्त केलं. काल (शनिवार, १४ सप्टेंबर) उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर होते. निर्णय घेतल्यानंतर सगळ्याचा खुलासा करणं गरजेचं होतं, असं सांगत उदयनराजे भोसले यांनी अनेक गोष्टींवर खुलासा केला.

काय बोलले उदयनराजे भोसले?

  1. ईव्हीएमबाबत मला शंका होती. मला पत्रकारांनीही त्यावर विचारलं. पण माझी शंका दूर झाली आहे. लोकं कामासाठी मतदान करतात हे माझ्या लक्षात आलं आहे.
  2. शिवेंद्रराजे आणि मी विरोधी पक्षाचे असतानाही मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यासाठी निधी दिला.
  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ही कामाची माणसं
  4. स्वतःसाठी नाही, साताऱ्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला
  5. साताऱ्यात मेडिकल कॉलेज झालेच पाहिजे. कृषी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे उपक्रेंद्र व्हायला हवे
  6. माझा लोकसभा निवडणुकीत विजय झाला असला तरी नैतिकदृष्ट्या माझा पराभव झाल्याचे मी मानतो
  7. आडवा आणि त्याची जीरवा’, या राजकारणाला कंटाळूनच भाजपात येण्याचा निर्णय घेतला
  8. विरोधीपक्षांनी आपली अवस्था अशी का झाली? याचे आत्म परिक्षण केले तर, आत्मक्लेषाची वेळ येणार नाही
  9. जनतेला कामांचा हिशेब द्यावा लागतो. त्यामुळं कामांच्या माणसांसोबत असणं महत्त्वाचं आहे
  10. सत्तेत असूनही माझ्या कामाच्या फायलींवर फुलीच मारलेली होती...

‘कामं मार्गी लावणारी माणसं’
उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील ही कामं मार्गी लावणारी माणसं आहेत. त्यामुळं कामं करणाऱ्या माणसांसोबत आपण राहिलं पाहिजे. या हेतूने मी भाजपमध्ये दाखल झालो. आधीच्या सरकारमध्ये घोंगडं भिजत ठेवण्याची प्रवृत्ती होती. आपल्या जिल्ह्याचे एक सुपूत्र (पृथ्वीराज चव्हाण) मुख्यमंत्री होते. पण, साताऱ्याचा विकास काही झाला नाही. तेही मुख्यमंत्री होते आणि हेही मुख्यमंत्री आहेत. पण, कामं यांनीच मार्गी लावली.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT