मुंबई : ज्या वृत्तवाहिन्यांनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत त्यांनी मतदारसंघनिहाय व बुथ निहाय निकाल जाहीर करावेत, वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एक्झीट पोल जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असतानाच सायंकाळी 6 वाजता वाहिन्यांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. विविध वाहिन्यांनी जाहीर केलेले आकडे वस्तुस्थितीदर्शक नसल्याने जनतेच्या मनात याबाबत प्रचंड रोष असल्याचेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
काही वाहिन्यांचे मतदारसंघातील अंदाज हे जनतेला गुरुवारी येऊ घातलेले निकाल याच पद्धतीचे असावेत अशी मानसिकता तयार करण्याकरिता तर जाहीर केले नाहीत ना? अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर साताऱ्याच्या नवलेवाडी येथे ईव्हीएम बिघाडाची घटना अत्यंत धक्कादायक असून तिथे प्रत्येक मतदान कमळालाच जात होते हे उघडकीस आले आहे. देशातील प्रत्येक बिघडलेले मतदान यंत्र कमळालाच मतदान कसे देते? हा प्रश्न जनतेला पडला असल्याचेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.