जळगाव - ‘अभ्यास करायचा नाही आणि नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा... अशा ‘ढ’ मुलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झाली आहे. सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून, त्यांना मते देत नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होतो. परंतु, ते दोष मात्र ‘ईव्हीएम’ला देत असतात,’ असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. जळगाव येथे महाजनादेश यात्रेत ते बोलत होते.
नंदुरबार येथून सुरू झालेली दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा आज धुळे येथून अमळनेर, धरणगाव मार्गे जळगावात दाखल झाली. रस्त्यात यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. जळगाव येथे सागर पार्क येथे जाहीर सभा घेण्यात आली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. राज्यात आज काँग्रेस, राष्ट्रवादीची स्थिती वाईट झालेली आहे. जनता त्यांना मते देण्यास तयार नाही. परंतु, ते ‘ईव्हीएम’ला शिव्या देत आहेत. सत्तेत असताना त्यांनी कामे केली नाही, आता विरोधात असतानाही ते केवळ आपल्या संस्था सांभाळत आहेत.’
विरोधक आमच्या मेगा भरतीबाबत विचारत आहेत. मात्र, त्यांनी आमच्या भरतीचा विचार करण्यापेक्षा त्यांच्यात होणाऱ्या गळतीचा विचार केला पाहिजे. आज या पक्षात राहण्यास कोणीही तयार नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.