महाराष्ट्र

वातावरणबदलामुळे दुहेरी संकट; शेती उत्पन्नासह जीवांवरही परिणाम

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे - एका बाजूला जगामध्ये कोरोनाचे संकट असतानाच मानवी हस्तक्षेप तसेच औद्योगिकीकरणामुळे राज्यातील सरासरी तापमानातही वाढ होत आहे. राष्ट्रीय तसेच राज्याच्या पातळीवर उपाययोजनांच्या कमतरतेमुळे प्राकृतिक आपत्ती, शेती उत्पन्न आणि पर्यावरणातील विविध जीवांवर याचा परिणाम होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. 

"समुचित एनवायरो टेक'च्या (एसएटी) संस्थापक संचालिका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे म्हणाल्या, ""देशातील औद्योगिकीकरणात महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात 9 टक्के उत्सर्जन हे राज्याचे आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानातही वाढ होत आहे. यासाठी हरितगृह वायू उत्सर्जनाला कमी करण्यास किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. यासाठी कृती आराखड्याचा वापर केला जाऊ शकतो. विविध राज्यांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील डेटाच्या आधारावर हा आराखडा तयार केला जातो. मात्र या आराखड्याची माहिती सर्व क्षेत्रांमध्ये पोचत नसल्याने त्या-त्या विभागामार्फत योग्य उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे सर्वांगीण प्रयत्न होतील व उपाययोजना करणे सोपे होऊ शकेल.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
जागतिक पातळीवर 360 अब्ज टनापेक्षा जास्त कार्बनचे उत्सर्जन झाल्यावर जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढते. प्रत्येकवर्षी जागतिक स्तरावर 42 अब्ज टन कार्बनचे उत्सर्जन होते. यामध्ये भारताचा सुमारे सात अब्ज टन उत्सर्जनाचा वाटा असून यात महाराष्ट्रातून सर्वाधिक उत्सर्जन होत आहे. पॅरिस कराराप्रमाणे 2030 पर्यंत 30 टक्‍क्‍यांनी हे उत्सर्जन कमी केले जाणार आहे. मात्र, यासाठी राष्ट्र किंवा राज्याच्या पातळीवर कोणतेच पाऊल उचलले नाही. यासाठी प्रशासनाने दरवर्षी किती उत्सर्जन होते, तसेच कार्बन शोषून घेण्यासाठी काय प्रयोग केले जातात, याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे. तसेच आर्थिक बजेटप्रमाणे कार्बन बजेटचीही सुरवात केली पाहिजे. 
- अनुपम सराफ, पर्यावरण अभ्यासक 
 
तापमानवाढीमुळे हवामान बदलाचा परिणाम : 
- ऋतू चक्रातील बदल 
- ध्रुवीय भागाचे बर्फ वितळणे 
- समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ 
- प्राकृतिक आपत्तींच्या संख्येत वाढ 
- आरोग्याशी संबंधित विविध आजारांचा धोका 
- प्राणी, पक्षी व वनस्पतींच्या विविध प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर 
- शेती उत्पन्नात घट, पाण्याच्या उपल्ब्धतेत ताण 
- दुष्काळ आणि पूर परिस्थितीत वाढ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तापमानवाढ कमी करण्याच्या उपाययोजना 
- खनिज व जैविक इंधनांचा वापर कमी 
- पर्यावरणातील कार्बन कमी करण्यासाठी वृक्षारोपण 
- कचरा व्यवस्थापनातील तंत्राच्या माध्यमातून कार्बन धरून ठेवणे शक्‍य 
- बदलत्या वातावरणाला समजून घेत त्याप्रकारे धोरण आखणे 
- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमध्ये बदल 
- प्रशासनाबरोबर सामन्यांमध्ये जनजागृती करणे 


हरितगृह वायू उत्सर्जन (कार्बन डायऑक्‍साईड व्यतिरिक्त इतर वायू) 
वायू : पर्यावरणात राहण्याचा कालावधी (वर्षांमध्ये) 
मिथेन : 12.4 वर्षे 
नायट्रोजन ऑक्‍साईड : 121 वर्षे 
हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी) : 13.4 वर्षे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT