महाराष्ट्र

ठिबक अनुदान पाच वर्षे रखडले 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी दिले जाणारे अनुदान पाच वर्षांपासून रखडले आहे.

ठिबक सिंचनाच्या अनुदानापैकी 80 टक्के वाटा केंद्र सरकारचा आणि 20 टक्के वाटा राज्य सरकारचा, असा फॉर्म्युला आघाडी सरकारच्या काळात होता. भाजप सरकारच्या काळात तो 50-50 टक्के असा करण्यात आला; मात्र त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. 

राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना राज्य सरकार "ठिबक'साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, शेतकरी पदरचे पैसे गुंतवून शेतात ठिबक सिंचन योजना राबवीत आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचेही अनुदान रखडले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60 टक्के आणि पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचे ठरले असतानाही राज्य सरकारने पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना ते दिलेलेच नाही. केंद्र सरकार मात्र आपल्या वाट्याचे 50 टक्के अनुदान वेळेवर देत आहे. 

तीन वर्षांतील परिस्थिती 
वर्ष ................शेतकरी.............अनुदान 
2013 - 14 ..... 2922............11 कोटी 65 लाख 
2014 - 15...... 2141...............9 कोटी 17 लाख 
2015 - 16...... 3000................8 कोटी 90 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT