Family-Planning
Family-Planning 
महाराष्ट्र

कुटुंब नियोजनात महिलांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा

राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया
सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो १.८ वरती स्थिरावल्याने लोकसंख्या नियंत्रणात आल्याची माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली.

शस्त्रक्रिया न करताही कुटुंब नियोजन करण्याची सुविधा आता शहरांबरोबरच ग्रामीण भागातही उपलब्ध झाली आहे. त्यासाठी छाया आणि अंतरा या गोळ्यांची मदत घेतली जात असून, तांबीही दर्जेदार वापरली जात आहे. मात्र, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांनी कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेतला आहे. मागील चार वर्षांत ५२ हजार ६१५ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असून, त्यामध्ये शहरी भागातील ३ हजार ८३२, तर ग्रामीण भागातील ४८ हजार ७८३ पुरुषांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे शहरातील दोन लाख ८६ हजार ७४० महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली असून, त्या तुलनेत ग्रामीण भागातील तब्बल १६ लाख ८७ हजार ५५८ महिलांनी कुटुंब नियोजन केल्याचेही कुटुंब कल्याण विभागाने सांगितले.

नागरी भागातील दोन लाख ९० हजार ५७२, तर ग्रामीण भागातील १७ लाख ३६ हजार ३४१ जोडप्यांनी कुटुंब नियोजन केले आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर स्थिरावला असून, लोकसंख्या नियंत्रणासाठी त्याचा मोठा फायदा झाला आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, मुंबई व पुणे जिल्ह्याने त्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सद्यःस्थितीत ६४ टक्‍के स्त्री-पुरुषांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासाठी अंतरा व छाया या गोळ्या अन्‌ दर्जेदार तांबी यांची मदत होत आहे. शस्त्रक्रियेविना कुटुंब नियोजनाकडे जोडप्यांचा कल वाढल्याने मागील तीन वर्षांत राज्याची लोकसंख्या स्थिर असल्याचे चित्र आहे.
- अर्चना पाटील, अतिरिक्‍त संचालक, कुटुंब कल्याण विभाग, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT