Cow
Cow 
महाराष्ट्र

गो-अभयारण्य प्रकल्प बासनात

दीपा कदम

मुंबई - गाय हा पाळीव प्राणी असल्याने तिच्यासाठी वनक्षेत्रात जागा देता येणार नसल्याचे सांगत ‘गो- अभयारण्य’चा प्रस्ताव राज्य सरकारने बासनात गुंडाळला आहे. शिवाय निराश्रित, भाकड गायींना जंगलात सोडले, तर वन्यजीव प्राण्यांपासून त्यांच्या संरक्षणाचा वेगळाच गंभीर प्रश्‍न बनण्याची शक्‍यता असल्याने वन विभागाने कानावर हात ठेवले आहेत. 

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्य सरकारकडे निराश्रित आणि भाकड गायींसाठी चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ‘गो- अभयारण्य’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. या प्रस्तावावर वन विभागाने आक्षेप घेतला आहे. ‘जंगल आणि वन्यजीव कायद्यानुसार ‘शेड्यूल ४’ च्या यादीमधील वन्यपशू, पक्ष्यांचा समावेश अभयारण्यात होतो. अभयारण्य स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा कायदा आहे. गाय हा पाळीव प्राणी असल्याने अभयारण्यात तिला कसे काय ठेवता येईल, असा प्रश्‍न वन विभागाने या प्रस्तावाला उत्तर देताना विचारला आहे.

पालनपोषणाचा प्रश्‍न गंभीर
हंसराज अहिर यांनी प्रस्तावात चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या भागातून सीमावर्ती भागात गायींची तस्करी होत असल्याचे म्हटले आहे. पकडलेल्या गायींचे संरक्षण आणि सांभाळ करण्यासाठी यंत्रणा नाही. जागेअभावी त्यांना ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पोषणाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. 

वन विभागाच्या जमिनीवर काय करायचे किंवा काय नाही करायचे, याबाबत सर्व अधिकार वन खात्याचे आहेत. गो-अभयारण्य स्थापन करायचे, तर केंद्रीय कायद्यात बदल करावा लागेल.
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT