Home
Home 
महाराष्ट्र

पुणे, मुंबईसह 9 शहरांतील परवडणाऱ्या घरांना मंदीची झळ

सकाळ वृत्तसेवा

नऊ शहरांत चार लाख परवडणारी घरे विक्रीविना
मुंबई - स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीची झळ परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना बसू लागली आहे. देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये चार लाखांहून अधिक परवडणारी घरे विक्रीविना पडून असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांचा सर्वाधिक शिल्लक साठा आहे.

दीर्घकाळापासून स्थावर मालमत्ता क्षेत्राला मंदीने हैराण केले आहे. ‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, गुरुग्राम, नोएडा, कोलकता, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या नऊ शहरांमध्ये सात लाख ९७ हजार ६२३ घरे विक्रीविना शिल्लक आहेत. यातील चार लाख १२ हजार ९३० घरे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीतील असल्याचे ‘प्रॉपटायगर डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल यांनी सांगितले.

प्रॉपटायगरच्या अभ्यासानुसार मुंबईत सर्वाधिक परवडणारी घरे शिल्लक आहेत. ४५ लाख किंवा त्याहून कमी किमतीच्या घरांचा परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत समावेश होतो. 

दरम्यान, विक्री ठप्प असल्याने नव्या प्रकल्पांऐवजी विकासकांनी अपूर्ण प्रकल्पांच्या पूर्णत्वाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदी कायम राहिल्यास केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT