संसारात वाढला कलह sakal
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! सोलापुरात दीड वर्षात सासरच्यांकडून मानपान-हुंड्यासाठी २७३४ विवाहितांचा छळ: ‘भरोसा सेल’मध्ये भांडण मिटवूनही छळाला कंटाळून महिला पुन्हा पोलिसांत

सासरच्यांकडून हुंडा, मानपान, दागिने, पैसा मागण्याच्या छळाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यात मागील दीड वर्षात तब्बल दोन हजार ६२४ विवाहितांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन न्याय मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील ७६२ महिलांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सासरच्यांकडून हुंडा, मानपान, दागिने, पैसा मागण्याच्या छळाला कंटाळून सोलापूर जिल्ह्यात मागील दीड वर्षात तब्बल दोन हजार ६२४ विवाहितांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन न्याय मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील ७६२ महिलांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली असून ५३० महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

विवाहापूर्वी साथ जन्म तुझी साथ सोडणार नाही म्हणणारा पती काही दिवसांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. आईप्रमाणे प्रेमळ बोलणारी सासू घरातील कामावरून सतत भांडण करते. बहिणीप्रमाणे मैत्री केलेली नणंद भावाचे कान भरून वहिनीला त्रास देते, लहान भावाप्रमाणे असलेला दीर स्वत: ‘ती’च्याकडे वाईट नजरेने पाहतो किंवा आई-वडिलांना, भावाला सांगून त्रास देतो, असे बहुतेक कौटुंबिक तक्रारींचे स्वरूप आहे. अनेक महिने निमूटपणे त्रास सहन करणाऱ्या काही विवाहिता कंटाळून टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या देखील करत आहेत. मुलीचे आई-वडील तिचा संसार मोडू नये, सुखाचा व्हावा या उद्देशाने तिच्या सासरचे मागतील त्या वस्तू, पैसे, दागिने देतात.

मात्र, मुलीच्या सासरच्यांची भूक वाढते आणि ती भूक भागविण्यासाठी ढाल म्हणून सुनेचा वापर करतात. सुनेला त्रास देण्यावरून सासरच्यांची पै पाहुण्यात बदनामी होऊ लागताच ते सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवितात, अशीही उदाहरणे पोलिसांनी सांगितली. ग्रामीणच्या तुलनेत सोलापूर शहरातून सर्वाधिक विवाहितांच्या तक्रारी दाखल होतात.

‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशनाची जबाबदारी पोलिसांवरच

अनेकांच्या तक्रारीत किरकोळ कारणे असतात, त्या पती-पत्नीस व त्यांच्या सासरकडील मंडळींना बोलावून घेऊन पोलिस त्यांचे समुपदेशन करतात. दीड वर्षात सोलापूर जिल्ह्यातील बाराशे अर्जदार महिलांचा वाद पोलिसांनी आपापसांत मिटविला आहे. परंतु, त्यातील अनेक महिलांनी समझोता झाल्यानंतरही सासरचा छळ सुरूच असल्याच्या पुन्हा तक्रारी केल्या आहेत. ‘भरोसा सेल’मध्ये मानसोपचारतज्ज्ञ, विधिज्ञ, प्रोफेशनल समुपदेशक व पोलिस असे लोक असणे अपेक्षित आहे. त्यांच्या समपुदेशनामुळे पती-पत्नीमधील वाद कायमचा मिटेल, असा त्यामागील विश्वास आहे. मात्र, सध्या सर्व जबाबदारी पोलिसांनाच पार पाडावी लागत असून त्यादृष्टीने पोलिस अंमलदारांना समुपदेशनाचे प्रशिक्षण देखील दिले जात नाही, अशी सद्य:स्थिती आहे. तरीदेखील, भरोसा सेलमधील अधिकारी, अंमलदार त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून पती-पत्नीतील वाद मिटविण्यात चांगली कामगिरी बजावत आहेत.

दीड वर्षातील महिलांच्या तक्रारी

  • (२०२४)

  • एकूण तक्रारी

  • १,९०८

  • आपापसांत मिटलेल्या तक्रारी

  • ९४०

  • पोलिस-न्यायालयात दाखल

  • ९६८

  • ------------------------------------------------------------------

  • (२०२५)

  • एकूण तक्रारी

  • ८२६

  • आपापसांत मिटलेल्या तक्रारी

  • ३५०

  • पोलिस-न्यायालयात दाखल

  • ३४६

  • प्रलंबित

  • १३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT