Marriage
Marriage 
महाराष्ट्र

उपक्रम एकच; योजना मात्र तीन

दीपा कदम

मुंबई - आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी एकावर एक सारख्याच तीन योजनांचा भडिमार केंद्र आणि राज्य सरकारने मागासवर्गाला आकर्षित करण्यासाठी केला आहे. आंतरजातीय विवाहासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान असलेली अडीच लाखांची योजना, केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे आंतरजातीय विवाहाला देण्यात येणारी अडीच लाखांचे अनुदान देणारी योजना अस्तित्वात असतानादेखील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानावर चालणाऱ्या समता प्रतिष्ठानतर्फेदेखील आंतरजातीय विवाहासाठी अडीच लाखांचे अनुदान जाहीर केल्याने प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 

लाभार्थींपर्यंत योजना सहज पोहोचाव्यात आणि त्याच्या परिणामकारकतेचे परिमाण तपासता यावे यासाठी योजनांची पुनरावृत्ती टाळण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कटाक्ष असतो. इथे मात्र आंतरजातीय विवाहाचे लाभार्थी मर्यादित असताना योजनांचा मात्र फापटपसारा केला जात आहे. राज्य सरकार नोंदणी आणि सामूहिक विवाह सोहळ्यातदेखील आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अडीच लाखांचे अनुदान देणार आहे, तर समता प्रतिष्ठानतर्फे केवळ सामूहिक विवाह सोहळ्यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख दिले जाणार आहे. राज्य सरकारतर्फे आंतरजातीय विवाहांना दिले जाणारे अनुदान कोणालाच नाकारले जाणार नसल्याने नवीन योजना जाहीर करण्याच्या आवश्‍यकतेसमोर यामुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

तीन योजना कोणत्या?
केंद्र- राज्य सरकार अनुदान - २.५० लाख
डॉ. आंबेडकर फाऊंडेशन - २.५० लाख
समता प्रतिष्ठान - २.५०लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT