घरकुल  e sakal
महाराष्ट्र बातम्या

पहिला हप्ता घेऊन १० वर्षे झाली, तरी ४५०० घरकुले कागदावरच! नियम ९० दिवसांत बांधकामाचा; आता प्रत्येक लाभार्थीवर अधिकाऱ्यांचे लक्ष, ‘या’ ४ टप्प्यात मिळणार अनुदान

प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यावर २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे दहा हजार बेघर लाभार्थींना हक्काचा निवारा देण्याच्या हेतूने प्रशासनाकडून १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. पण, दहा वर्षे झाल्यानंतरही त्यातील साडेचार हजार बेघर लाभार्थींची घरे कागदावरच आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यावर २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सुमारे दहा हजार बेघर लाभार्थींना हक्काचा निवारा देण्याच्या हेतूने प्रशासनाकडून १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. पण, दहा वर्षे झाल्यानंतरही त्यातील साडेचार हजार बेघर लाभार्थींची घरे कागदावरच आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार बेघर कुटुंबांना चालू वर्षात घरकुले मिळणार आहेत. त्या लाभार्थींना मंजुरी देऊन त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यांनी आता ९० दिवसांत घरकूल बांधून पूर्ण करणे अपेक्षित आहे. फाउंडेशनपर्यंत (पाया) काम पूर्ण झाल्यानंतर ७० हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. घरकुलाचे बांधकाम २५ चौरस मीटर चटई (किमान २६९ स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया) क्षेत्रफळात अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळात बांधकाम करताना लाभार्थींनी मुदतीत बांधकाम पूर्ण होईल, काम कोठेही थांबणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे.

सध्या दहा वर्षांपासून घरकुलाचे बांधकाम पूर्ण न केलेल्यांमध्ये बांधकामाचा आकार मोठा असल्याने अडचणी आलेले, आता बांधकाम सुरू करायला पैसेच नसलेले, एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झालेले, काही मयत, असे लाभार्थी आहेत. काही लाभार्थी अधिकाऱ्यांनाही सापडलेले नाहीत. दहा वर्षे झाली, प्रशासनाला त्या लाभार्थींना ना पैसे परत केले ना बांधकाम सुरू केले.

घरकूल अनुदानाचे टप्पे

  • पहिला हप्ता : १५,०००

  • दुसरा हप्ता : ७०,०००

  • तिसरा हप्ता : ३०,०००

  • चौथा हप्ता : ५,०००

  • मनरेगाअंतर्गत मजुरी : २६,७३०

  • शौचालयासाठी अनुदान : १२,०००

...तर ४२ हजार रुपयांचे जास्त अनुदान

घरकुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण करत असताना शेवटच्या हप्त्यात राज्य सरकारकडून लाभार्थींना सुमारे ४२ हजार रुपयांचे अनुदान जास्तीचे दिले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थींचे बांधकाम ९० दिवसांत शेवटच्या टप्प्यावर अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भातील ग्वाही दिल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुदान वाढीव मिळणार असल्याने बांधकाम थांबण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT