rajendra-singh
rajendra-singh 
महाराष्ट्र

"जलयुक्त शिवार ठेकेदारीमुक्त करा' 

सकाळवृत्तसेवा

पंढरपूर - राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून लाखो लिटर क्षमतेचे पाणीसाठे निर्माण झाले आहेत. जलयुक्त शिवार योजना आणखी गतिमान करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. सरकारने ही योजना ठेकेदारीमुक्त केली तर या योजनेत अधिक लोक स्वतः सहभागी होतील, असे मत राष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. 

पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील कासाळगंगा ओढ्याच्या पुनरुज्जीवन प्रकल्प पाहणीसाठी ते आज येथे आले होते. पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी जलसाक्षरता या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, ""लोकसहभाग आणि सरकार यांच्या माध्यमातून नद्या, ओढे आणि नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम अनेक पातळ्यांवर सुरू आहे. नद्या आणि ओढ्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे दुष्काळी भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. चंद्रभागा ही एक प्रमुख नदी आहे. राज्य सरकारने "नमामि चंद्रभागे'च्या माध्यमातून नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सरकारने या योजनेची घोषणा केली असली तरी अद्याप या कामाला सुरवात झाली नसल्याची खंतही या वेळी त्यांनी बोलून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT