Sharad-pawar
Sharad-pawar 
महाराष्ट्र

माढ्यातून लढण्यावर पवारांचे शिक्कामोर्तब 

सकाळवृत्तसेवा

टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. 

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पिंपळनेर (ता. माढा) येथील स्नेहल मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. 

ते म्हणाले, मोदी सरकारने नोटाबंदीमुळे दहशतवाद, भ्रष्टाचार संपेल असे म्हटले होते; पण नोटाबंदीनंतर दहशतवाद व भ्रष्टाचार वाढला आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. जीएसटीमुळे जे व्यापारी "मोदी मोदी' म्हणत होते, ते आज शिव्या घालत आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द पाळला नाही. बेरोजगारी संपविण्याचे आश्वासन दिले; पण निती आयोगाने साडेचार वर्षांत बेरोजगारी वाढल्याचे जाहीर केले आहे. सरकारच्या धोरणामुळे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, रिझर्व्ह बॅंक, न्यायालयही सुटले नाही. "न खाऊँगा, न खाने दूँगा' म्हणणाऱ्यांनी राफेलमध्ये 560 कोटींचे विमान सोळाशे कोटींना खरेदी केले. हे झाले कसे, याची चौकशी करायला सरकार तयार नाही. 

सहकार्याची भूमिका कायम स्मरणात - पवार 
सोलापूर जिल्ह्यातील येथील सर्व मंडळींनी जिल्हा व राज्याच्या विकासासाठी एकजुटीने आम्हाला सहकार्य करण्याची जी भूमिका घेतली आहे, ती कायम आमच्या स्मरणात राहील. प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा उपयोग कसा करायचा, या दृष्टीने पुढील काळात पावले टाकली जातील, असा विश्वासही पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT