narendra modi  file photo
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदी सरकारचं ऐकत नाहीयत - काँग्रेस

तिसऱ्या लाटेत ६० लाखापेक्षा जास्त नागरिक संक्रमित होऊ शकतात.

दीनानाथ परब

मुंबई: "भारतीय जनता पार्टीकडून खालच्या दर्जाचं राजकारण (bjp politics) सुरु आहे. केंद्र सरकारकडून सातत्याने पत्र लिहून महाराष्ट्राला तिसरी लाट (Maharashtra third wave) कधीही येऊ शकते असा इशारा दिला जात आहे. त्यात ६० लाखापेक्षा जास्त नागरिक संक्रमित होऊ शकतात. नीती आयोगाने इशारा दिला आहे. असं असतानाही ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे, ते पाहता नीती आयोगाने अनीतीमान भाजपाचा शंकासूर झालाय त्यांना आधी समज द्यावी, महाराष्ट्र सरकाराल समज देण्याची गरज नाही" असे काँग्रेसचे (congress) सरचिटणीस सचिन सावंत (sachin sawant) यांनी म्हटलं आहे.

"जन आशीर्वाद यात्रेत अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. परंतु एवढे गुन्हे दाखल होऊनही भाजापाचं डोकं ठिकाणावर येत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी भाजपाचे नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं राजकरण करत होते. भाजपा सुपरस्प्रेडर झाला आहे" अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

"स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी आंधळे झालेत. जनहित, जनतेचा जीव धोक्यात घालतोय याची तमा राहिलेली नाही. म्हणूनच आमची पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे. दहीहंडी, मंदिर उघडण्याचं राजकारण केलं जातय. केंद्रीय सचिव राजेश भूषण पत्र लिहून उत्सवावर निर्बंध घाला सांगत आहेत. पण हे मोदी सरकारचं ऐकत नाहीत. पण हे ऐकत नसतील, तर त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. दया-माया दाखवू नये, अत्यंत खालच्या पातळीची राजरकण सुरु आहे" अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT