Irrigation 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2019 : कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Budget 2019 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) विधानसभेत सादर केला. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटले आहे.

कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद करण्यात आली असून बळीराजा योजनेसाठी 1 हजार 530 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बळीराजाचे जीवनमान उंचावण्याचे सरकारचे ध्येय असून गेल्या 4 वर्षांत 140 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीही देण्यात आला असून जलयुक्त शिवार योजनेसाठी 8 हजार 946 कोटींचा निधी दिला असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

जलयुक्त शिवार योजनेत 25 लाख गावे टंचाईमुक्त करण्याचे आव्हान असून सूक्ष्मसिंचनासाठी 350 कोटींचा निधी राखून ठेवणार आहे. तसेच 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर असून दुष्काळी भागात 'मागेल त्याला शेततळे' ही योजना राबवण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 67 हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

चंद्रपूर, जामखेड, यवतमाळ, पेठ येथील अन्न व कृषी विद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली.

'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' यावर भारतीय नागरिकांचा विश्वास असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT