महाराष्ट्र

काँग्रेसची पडझड सुरु; प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून कॉंंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात कॉंंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कॉंंग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवानंतर कॉंंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून खुद्द कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कॉंंग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा दिला आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज बब्बर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मी आपल्या महाराष्ट्र कॉंंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा असल्याचे अशोक चव्हाण खाजगी वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले. तसेच यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. तसेच लवकरात लवकर मी राहुल गांधी यांची यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंंग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर विजय मिळवता आला होता. त्यानंतर आता यावेळी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला महाराष्ट्रात केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. ज्यांना यापूर्वी उमेदवारी नाकारण्यात आली होती अशाच सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूरमधून विजय मिळवत कॉंंग्रेसची लाज राखली आहे. त्यातच अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांसारख्या दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 9 ते 10 जागांचे नुकसान सोसावे लागले असल्याची कबुलीही अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

SCROLL FOR NEXT