Maharashtra has four awards for MNREGA
Maharashtra has four awards for MNREGA 
महाराष्ट्र

महाराष्ट्राला मनरेगाचे चार पुरस्कार 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार' पुरस्काराअंतर्गत (मनरेगा) महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना "जलयुक्त शिवार' व "मागेल त्याला शेततळे' या योजनेअंतर्गत झालेल्या रोजगारनिर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे. 

मंगळवारी (11 सप्टेंबर) दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट कार्यालय अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. जलसिंचनातील उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

गडचिरोली जिल्हा हा मनरेगाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. 
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातीलच गडचिरोली ब्लॉकमधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

श्रीमती नूतन प्रकाश उत्कृष्ट डाकसेवक 
ठाणे जिल्ह्यातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नूतन प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगाअंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT