महाराष्ट्र

"ईव्हीएम' गैरकाराभाराबाबत निवेदन करण्याचा आदेश 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई  - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बुलडाण्यातील "ईव्हीएम' गैरकाराभाराबाबत निवेदन करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी स्थगन प्रस्ताव मांडत विधान परिषदेत सभागृहाचे लक्ष वेधले. 

दत्त म्हणाले, की बुलडाणा जिल्हा परिषदेतील केंद्र क्रमांक 56- सुलतानपूर (ता. लोणार) येथे फेब्रुवारी 2017 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आशा जोरे यांचे नारळ हे चिन्ह होते. या ठिकाणी झालेल्या मतदानाबाबत जोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत तपासणी केल्यावर "नारळ' या चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतरही मत भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचा अहवाल दिला आहे. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. 

या अहवालानुसार "ईव्हीएम' यंत्रात फेरफार करता येऊ शकतो हे यामुळे सिद्ध झाले आहे, असे दत्त यांनी सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वीदेखील झाल्या असून, राज्य निवडणूक आयोगाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दत्त यांनी केला. त्यांच्या स्थगन प्रस्तावाची दखल घेऊन याबाबत सभागृहात निवेदन करण्याचा आदेश रामराजे यांनी सरकारला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT