महाराष्ट्र

विद्यार्थी, पालकांनो आधी तणावमुक्त व्हा!

सकाळवृत्तसेवा

बारावीची परीक्षा येत्या २२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. लवकरच दहावीच्याही सुरू होतील. कोणताही तणाव न घेता या परीक्षांना सामोरे जायला हवे. त्यादृष्टीने तज्ज्ञांनी सांगितलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही निश्‍चितच उपयुक्त ठरतील.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा जितक्‍या महत्त्वपूर्ण आहेत, तितक्‍याच तणावपूर्ण. हा तणाव विद्यार्थ्यांमध्ये झोप न येणे, भूक न लागणे, चिडचिड, डोकेदुखी, पोटदुखी, नैराश्‍य, परीक्षेत अभ्यासाचा विसर पडणे अशा गोष्टींमधून दिसून येतो. या सर्वांवर मात करण्यासाठी महत्त्वाचे आहे, परीक्षेच्या तणावाला योग्य रितीने हाताळून तणावमुक्त परीक्षा देणे. परीक्षेच्या दिवसांमध्ये तणाव वाटणे साहजिक आहे. या तणावावर मात करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी एकमेकांशी संवाद ठेवणे महत्त्वाचे ठरते. या बरोबरच विद्यार्थ्याला गरज असते, ती पाठीवरून विश्‍वासाचा आणि मायेचा हात फिरवण्याची. ती गरज पालक आणि त्यांचे शिक्षकच पूर्ण करू शकतात. अनेकदा विद्यार्थी यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून हेल्पलाइनही काढल्या जातात. या हेल्पलाइनलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

परीक्षेपूर्वी तसेच परीक्षा काळात या गोष्टी कटाक्षाने पाळा... 
 परीक्षेच्या एक दिवस आधी संपूर्ण पुस्तक वाचणे आणि लक्षात ठेवणे कधी कधी कठीण जाते. अशा वेळी धड्याची किंवा उत्तराची समरी बनवून लक्षात ठेवणे योग्य. की-वर्डस, चार्टस, डायग्राम, टेबल्स अशा गोष्टींचा वापर करून अभ्यास लक्षात ठेवणे सोपे जाते.

 अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. वेळापत्रक एका कागदावर लिहून अभ्यासाच्या टेबलासमोर लावावे.

 जो भाग कठीण असेल तो सकाळच्या वेळी किंवा झोपण्याआधी वाचवा तेव्हा आपली स्मरणशक्ती जास्त तल्लख असते.

 तासन्‌ तास अभ्यास करू नये. प्रत्येक तासाने १०-१५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा.

 जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा जास्त लक्ष देऊन अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. 

 नकारात्मक विचार जसे माझा अभ्यास झाला नाही, मला पेपर कठीणच जाणार, यामुळे परीक्षेचा तणाव वाढतो. हे नकारात्मक विचार करण्यापेक्षा अधिक मेहनत घेऊन आपले सर्वोत्तम देणे महत्त्वाचे असते.

 मानसिक तणाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ, योगा, स्वच्छ हवेत फिरणे या गोष्टी कराव्यात. 

 स्वत:वर विश्‍वास ठेवून आणि मेहनत करून परीक्षेला सामोरे जाणे, ही यशाची गुरूकिल्ली आहे.

 पेपर झाल्यानंतर त्या पेपरबद्दल इतरांशी बोलणे टाळावे. जर चर्चा केलीच तर त्या पेपरचा तणाव घेणे टाळावे. कारण तो पेपर झाला असून, आता त्या पेपरचा तणाव मनावर घेऊन काहीही निष्पन्न होणार नाही, हे लक्षात घ्यावे.

 आपल्याला झालेल्या पेपरबद्दल कितीही चिंता वाटत असली तरी तो पेपर आता झाला असून, आता पुढील पेपरचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे आहे, ही बाब लक्षात घेऊन पुढील पेपरच्या अभ्यासाला सुरवात करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT