महाराष्ट्र

मोरारजींचा "भारतरत्न' परत घेण्यासाठी याचिका

सकाळवृत्तसेवा

मुंबई - माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना 1991 मध्ये सरकारने दिलेला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' मागे घ्यावा, या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने नकार दिला.

मोरारजी देसाईंनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच भारतरत्न व पद्म पुरस्कारांना विरोध केला. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी वकील धनंजयसिंग जगताप यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे.

मोरारजी देसाईंनी त्यांच्या "स्टोरी ऑफ माय लाइफ' या आत्मचरित्रात पद्म व भारतरत्न या पुरस्कारांना त्यांचा विरोध असल्याचे म्हटले आहे. या पुरस्कारांनी सन्मानित काही दिग्गजांनी त्याचा गैरवापर केल्याचेही आत्मचरित्रात नमूद आहे. याचाच आधार घेत याचिकाकर्त्या वकिलांनी देसाई दुटप्पी असल्याचे म्हणत भारतरत्न मागे घेण्याची मागणी केली. भारतरत्न व पद्म पुरस्कारांना विरोध करणाऱ्या व पंतप्रधानपद भूषवत असताना हे पुरस्कार स्थगित करणाऱ्या मोरारजी देसाईंनी 1991 मध्ये भारतरत्न व पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "निशान-ए-पाकिस्तान' स्वीकारला, असे म्हणत सरकारने त्यांना दिलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेले धनंजयसिंग जगताप यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT