महाराष्ट्र

सरसकट कर्जमाफी होईपर्यंत लढा सुरूच - अशोक चव्हाण

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कर्जमाफीबाबत खोटी आकडेवारी जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. शिवसेनेचीही भूमिका दुटप्पी असून, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात कॉंग्रेसने एल्गार केला आहे.

बुधवारी बुलडाणा येथे खासदार चव्हाण यांनी "माझी कर्जमाफी झाली नाही' या राज्यव्यापी आंदोलनाची सुरवात केली. त्यानंतर एल्गार सभेत चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की राज्य सरकारचा शेतकरीविरोधी चेहरा नागरिकांसमोर आला आहे. "एक ही भूल, कमल का भूल' असे राज्यातील शेतकरी म्हणू लागले आहेत. सरकारने जाहीर केलेली आकडेवारी खोटी असून, सरकार नागरिकांची फसवणूक करत आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी 34 हजार कोटींची नसून, फक्त पाच हजार कोटी रुपयांची आहे. केवळ 15 लाख शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.

कर्जमाफीपासून दूर राहिलेल्या आणि सातबारा कोरा न झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे अर्ज बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवले जातील. सरकारने 30 जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. सरसकट कर्जमाफी होईपर्यंत कॉंग्रेसचा लढा सुरूच राहील, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT