महाराष्ट्र

जलसिंचनाच्या बाबतीतही महाराष्ट्र अव्वल

संजय मिस्कीन

एका वर्षात १३ लाख हेक्‍टर विक्रमी सिंचन
मुंबई - जलसिंचन प्रकल्पांच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असताना आता प्रत्यक्ष जलसिंचनाच्या बाबतीतही राज्याने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यासाठी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचा जलसिंचन व्यवस्थापनाचा यंदाचा पहिला पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला आहे. राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

राज्यात ३३०० धरणांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात या धरणांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यात तब्बल ८२ टक्‍के पाणीसाठा होता. धरणांत पाणी असले तरी कालव्यांची कामे परिपूर्ण नसल्याने त्याचा लाभ प्रत्यक्ष सिंचनासाठी होत नसल्याचे चित्र होते.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था निर्माण करून ‘कडा’ पद्धतीच्या कालव्यांनी सिंचन करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या एका वर्षात ३२४२ पाणी वापर संस्था राज्यभरात निर्माण झाल्या. त्यातून १३ लाख हेक्‍टरपर्यंतचे प्रत्यक्ष सिंचन झाले असून, सिंचन व्यवस्थापनाचे हे विक्रमी यश असल्याचे मानले जाते.  

धरणातील मुख्य कालव्याची कामे झाली, तरी शेतकऱ्यांना सरकारी कालव्यातून थेट पाणी देण्यात अनेक अडचणी येत असल्याने कामे रेंगाळली होती. शेतकऱ्यांना पाणी वापर संस्था स्थापन करण्यास प्राधान्य दिल्याने बांधाबांधावरचे वाद मिटले असून, शेतकरी समूहाने पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचनाचे नियोजन करत असल्याने हे यश मिळाले आहे. 

जलसंपदा विभागाने राज्याचे प्रत्यक्ष जलसिंचन आगामी दोन वर्षांत ४० लाख हेक्‍टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात पाणी वापर संस्थांमुळे एका वर्षात १३ लाख हेक्‍टर इतके सिंचन क्षेत्र वाढल्याने हे राज्याचे एकूण सिंचन क्षेत्र ४० लाख हेक्‍टरपर्यंत नेण्यात यश येईल, असा विश्‍वास जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. सध्या फक्‍त ३०० धरणांची कामे बांधकामाधीन आहेत.

पाणी वापर संस्थांची कामगिरी 
विभाग              क्षेत्र ( हेक्‍टर)
पुणे - ९९७             ४०२९६२ 
औरंगाबाद - ६५१    ३१८२४२ 
अमरावती - ४०२    १२७६०२ 
नागपूर - ४४७       १८७३५१ 
नाशिक - ६९८       २५३१४९ 
कोकण - ४७         १२७८७ 
एकूण - ३२४२      १३०२०९३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT