महाराष्ट्र बातम्या

निर्यातबंदीनंतरही कांद्याला भाव 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे झालेले नुकसान, त्यामुळे घटलेले लागवड क्षेत्र, उन्हाळ कांद्याची वाढलेली सड, नवीन कांद्याच्या उत्पादनाला होणारा उशीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील आगाप कांद्याचे पावसामुळे ४० टक्क्यांपर्यंत झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी सावध चाल तसेच देशांतर्गत असणाऱ्या मागणीमुळे निर्यांतबंदीनंतरही कांदा भाव खाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. कांदा दर प्रति किलोला ५० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कमाल ४५९० रुपये दर मिळाला. तर सर्वांत किमान दर प्रतिक्विंटल २०० रुपये सिन्नर बाजार समितीत मिळाला. निर्यातबंदीनंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी आवक घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक होण्यास साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज कांद्याचे प्रमुख आडतदार विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की सध्या महाराष्ट्रातच कांदा कमी असल्याने परराज्यातून आवकेची शक्यता होती. मात्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्येही पावसाने कांदा भिजला आणि नवी लागवड कमी आहे. त्यामुळे कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पणन मंडळाच्या अंदाजानुसार आगामी हंगामातील खरीप कांद्याची आवक पावसामुळे लांबण्याची शक्यता आहे. साठवणुकीतील कांदा चक्रीवादळात भिजला तर काही प्रमाणात कांदा निर्यात झाला आहे. त्यामुळे आता कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचे दर चढे राहतील.

उन्हाळ कांदा दरात सुधारणा असली तरी ७० टक्के कांदा कमी दरात विकला गेला. त्यात उरलेल्या कांद्याचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बरोबरी होईल, अधिक मिळेल असे काही चित्र नाही. 
- विजय पगार, कांदा उत्पादक, कळवण, जि. नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT