पालघरमधल्या गुजरात सीमेजवळ रात्री काही साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका झाली होती. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.
याबद्दल राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवं प्रतिज्ञापत्र दाखल कऱण्यात आलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. पालघर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर राज्य गुन्हे शाखेकडे दिलं होतं. त्यानंतर राज्य सरकारच्या हालचालीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
पालघर जिल्ह्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० मध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या संशयामुळे जमावाने काही जणांवर हल्ला केला. यामध्ये अंत्यसंस्काराला गुजरातकडे चाललेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.