Police commissioner's testimony to cooperate with the Waluj industrialists
Police commissioner's testimony to cooperate with the Waluj industrialists 
महाराष्ट्र

वाळूजच्या उद्योजकांना सहकार्य करू पोलिस आयुक्तांची ग्वाही 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : वाळूज परिसरातील कंपन्यांमध्ये जमावाने तोडफोड करून मोठे नुकसान केले. यासंदर्भात उद्योजकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी (ता. 11) पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. या वेळी पोलिस आयुक्त म्हणाले, "कंपन्यांची तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीबाहेरील फाटकाच्या रचनेला महत्त्व देण्यापेक्षा मजबुती व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे. यापुढे औद्योगिक वसाहतीत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशांवर निर्बंध यावेत, यासाठी उद्योजकांना पोलिस सहकार्य करतील.'' 

मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्यांनी हे कृत्य केल्याचेही उद्योजकांनी या भेटीत स्पष्ट केले. शिवाय नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलिस आयुक्तांना दिली. या वेळी सुनील कीर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतिंगे, अमित राजळे, राहुल घोगरे आदी उद्योजक उपस्थित होते. 

आयुक्तांचा सल्ला... 
-कंपनीच्या सुरक्षेवर भर द्या. 
-औद्योगिक वसाहतीत प्रवेशद्वारावरच नियंत्रण गरजेचे. 
-कंपनीत गेटकीपरपेक्षा तगडे सुरक्षारक्षक नेमा. 
-केवळ सुरक्षारक्षक एजन्सीच्या भरवशावर न राहता लायक व्यक्ती सुरक्षेसाठी निवडा. 
-प्रॉपर्टी संरक्षणाचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याचा वापर करा. 
-तपास नव्या पोलिस उपायुक्तांकडे. 
-औद्योगिक वसाहतींच्या नव्याने सुरक्षा उपाययोजना करा. 
-पोलिसांचे मनुष्यबळ सुरक्षेला देऊ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT