महाराष्ट्र

या मंत्र्यांची हकालपट्टी करा- विखे पाटील

सकाळवृत्तसेवा

सांगली : "लाखो क्विंटल तूर पडून आहे. हे राज्य सरकार आणि कृषी मंडळाचे अपयश आहे. हे अपयश स्वीकारून या मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे," असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.    

संघर्षयात्रेदरम्यान विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "शिवसेनेमध्ये जरा तरी काही उरले असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानी संघटना ही स्वाभिमानी राहिली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याच्यावर काही बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करून मंत्रिपद घेतले, पण शेतकरी यांना माफ करणार नाही."

"उद्धव ठाकरे यांची 'चला, हवा येऊ द्या' अशी परिस्थिती झाली आहे. राजीनामे कुठे गेले काही माहीत नाही. कपड्यांबरोबर गेले असतील, अशी नौटंकी त्यांची चालू आहे," असा टोला उद्धव यांना विखे पाटील यांनी लगावला. 'प्रत्येक गोष्टीमध्ये वेळकाढूपणा ही या सरकारची नीती आहे,' अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

आर.आर. आबांची आठवण

विखे-पाटील, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेवेळी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. संघर्ष यात्रेवेळी त्यांची उणीव आम्हाला वारंवार भासत आहे. विरोधात असताना सरकारला सळो की पळो करून सोडणारे आबा आज असते, तर राज्यातील सरकारची त्यांनी कोंडी केली असती, असे मत त्यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT