महाराष्ट्र

"जलदूत'च्या बिलाचा लातूर पालिकेला झटका 

हरी तुगावकर

लातूर - शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा कसा करता येईल, याची चाचपणी सुरू असतानाच 2016 मध्ये "जलदूत' या विशेष रेल्वेगाडीने शहराला पाणीपुरवठा केल्याचे बिल रेल्वे प्रशासनाने पाठवून महापालिकेला मोठा झटका दिला.

तब्बल नऊ कोटी 90 लाख रुपयांच्या बिलाची ही नोटीस असून, ते तातडीने भरावे, अशी सूचनाही करण्यात आल्याने "जलदूत'चे बिल घेतले जाणार नाही, अशी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. आर्थिकदृष्ट्या "आयसीयू'मध्ये असलेल्या महापालिकेला आता हे बिल कसे भरायचे, असा प्रश्न पडला आहे. 

मांजरा धरण कोरडे पडल्यानंतर एप्रिल ते ऑगस्ट 2016 या कालावधीत "जलदूत'ने मिरज ते लातूर खेपा मारून नागरिकांची तहान भागवली होती. यंदाही सप्टेंबर सुरू झाला तरी जलस्रोत कोरडेच आहेत. उर्वरित दिवसांतही पाऊस झाला नाही, मांजरा धरण भरले नाही तर मिरज, पंढरपूर व उस्मानाबादहून रेल्वेने पाणी आणता येते का, याची प्रशासनाने पुन्हा चाचपणी सुरू केली आहे. त्यातच रेल्वेने 11 कोटी 80 लाख 88 हजार 625 रुपयांच्या मागील बिलाची नोटीस दिली आहे. काही संस्थांनी परस्पर काही बिल भरल्याने महापालिकेकडे नऊ कोटी 90 लाख 30 हजार 518 रुपयांची मागणी रेल्वेने केली आहे. 

रेल्वेने पाणी आल्याचे बिल द्यायचे असते, हे महापालिका विसरून गेली होती; पण बॉंबे चेंबर्स ऑफ कॉमर्सने एक कोटी 87 लाख 76 हजार 300 रुपये परस्पर रेल्वेला भरले आहेत; तसेच एका स्वयंसेवी संस्थेने दोन लाख 89 हजार 634 रुपये या बिलापोटी रेल्वेला दिले आहेत. याची महापालिकेला कल्पनाही नाही. रेल्वेने पाठवलेल्या नोटिशीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केल्याने महापालिकेलाही ही माहिती मिळाली आहे. 

"मोफत'च्या घोषणेचे काय? 
रेल्वेने पाणीपुरठा सुरू असताना रेल्वेने पहिल्यांदा चार कोटी रुपयाचे एक बिल महापालिकेला दिले होते. त्या वेळी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लातूरला रेल्वेने मोफत पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तेथेच हा विषय थांबला. महापालिकेलाही हायसे वाटले. रेल्वेनेही नंतर पत्रव्यवहार केला नाही. आता पुन्हा लातूरला "जलदूत'ची गरज लागणार आहे, हे लक्षात येताच पूर्वीच्या बिलाची नोटीस दिली आहे. त्यामुळे महापालिकेला झटका बसला आहे. राज्य शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आता व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT