CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा : उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपापल्या आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी आणि उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी मेहनतीची तयारी ठेवा असंही अवाहन करण्यात आलं आहे.

(SSC Result 2022)

"शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

दरम्यान आज दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा निकाल लागला असून यामध्ये ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६ एवढा आहे. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) लागला आहे.

तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के) विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT