महाराष्ट्र

'चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार'; अशोक चव्हाण यांचे सूचक वक्तव्य

वृत्तसंस्था

मुंबई : मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या एक्झिट पोलवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली. एक्झिट पोल हा एक धंदा झाला आहे. एक्झिट पोल हे चुकीच्या पद्धतीने ठरवून दिले जात आहेत, असे ते म्हणाले. तसेच चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार आहे, असेही ते म्हणाले.

भोकरमधील जागा पडल्यात जमा आहे. अशोक चव्हाण पडणार असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात 97 हजार मताधिक्याने भोकरची जागा निवडून आली आहे. त्यामुळे एक्झिट पोल धंदा झाल्याचं परखड मत चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कलम 370 चा फायदा भाजपला नाही 

भाजपने निवडणुकीत प्रचारासाठी 370 कलमचा वापर केला. याचा त्यांना फायदा झाला नाही. 370 ऐवजी महाराष्ट्राला अनुषेश दूर करण्यासाठी 371/2 ची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.  

चर्चा करून पुढची रणनिती ठरविणार

आघाडीच्या सत्तास्थापनेबाबत काही हालचाली सुरू आहेत का?, असा सवाल पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना विचारला. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, आज मी मुंबईला जात आहे. सहकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT