devendra fadanvis
devendra fadanvis 
महाराष्ट्र

नाणार प्रकल्प लादणार नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ - मुख्यमंत्री 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : नाणारचा प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी व पर्यावरणपूरक असला, तरी नागरिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प लादणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.13) विधान परिषदेत दिले. स्थानिकांच्या विरोधासह शिवसेना, तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकल्पास विरोध दर्शवला होता. गेले काही दिवस विधान परिषदेतही या प्रकल्पाच्या निषेधार्थ घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता. अखेरीस आज मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ व नाणारवर हा प्रकल्प लादणार नाही अशी भूमिका मांडली.    

या प्रकल्पासाठी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. याशिवाय आम्ही विरोधक, नागरिक व या प्रकल्पाशी संबंधित सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहेत. जर हा विरोध कायम राहिला तर आम्ही हा प्रकल्प लादणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोकणातील आंबा बागांचे या प्रकल्पामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असल्याने कोणताही त्रास होणार नाही. यापूर्वी समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता, पण तो प्रश्न चर्चा करून सुटला. त्याप्रमाणेच नाणारचा ही विचार व्हावा व चर्चा करून हा मुद्दा हा सोडविण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. 

राज्य सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी प्रयत्न केले होते, तसेच या प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीची उपाययोजना करण्यात आली आहे. पण जिथे विरोध होतो तिथे प्रकल्प लादायचा नाही हे सरकारचे धोरण आहे, त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT