औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू
औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू  
मराठवाडा

औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू

सकाळवृत्तसेवा

देवगाव रंगारीमार्गे नेण्याचा बदल केला रद्द

औरंगाबाद : औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्‍यातील टापरगाव येथील शिवना नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून पुलावरून होणारी एसटीची वाहतूक गुरुवारपासून (ता.24) इतर मार्गाने वळविण्याचे आदेश वाहतूक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिले. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारपासून (ता.29) अर्ध्या तासाला औरंगाबाद-टापरगाव बससेवा सुरू केली आहे. देवगाव रंगारीतर्फे करण्यात आलेला बदलही रद्द करण्यात आला आहे.


औरंगाबादकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक औरंगाबाद-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-नांदगाव-मालेगावमार्गे धुळ्याकडे सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे 26 किलोमीटरचा फेरा वाढविण्यात आला होता. 32 रुपये भाडेवाढही करण्यात आली होती; मात्र हा मार्ग लांब पल्ल्याचा असल्यामुळे प्रवासी घटले होते. त्यानंतर औरंगाबाद ते टापरगाव आणि टापरगाव ते कन्नड व धुळे बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, औरंगाबाद-टापरगाव 45 किलोमीटरपर्यंत दर अर्ध्या तासाला बसगाडी चालविण्यात येणार आहे. सकाळी सहापासून रात्री आठपर्यंत दहा बसगाड्यांच्या 60 फेऱ्या होणार आहेत. याचे नियोजन करण्यात आले आहे. कन्नड डेपोकडून टापरगाव ते कन्नड आणि पुढे धुळ्यापर्यंत बसगाड्या चालविण्यात येणार आहे. यासाठी टापरगाव येथे नियंत्रक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक संतोष नजन यांनी सांगितले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT