Challenges to Parents RTE Admission Confirmation aurangabad
Challenges to Parents RTE Admission Confirmation aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

आरटीई प्रवेश निश्‍चितीचे पालकांपुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यात पहिल्या फेरीत जिल्ह्यातील ४ हजार १९३ बालकांची निवड करण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करण्यासाठी पालकांना २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतू, दहा दिवस उलटून गेल्यानंतरही केवळ ४४६ प्रवेश निश्‍चित झाले आहेत. उरलेल्या तीन दिवसांत ३ हजार ७४७ पाल्यांचे कागदपत्र पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करण्याचे आव्हान पालकांसमोर आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता औरंगाबाद जिल्ह्यातून १७ हजार ३९३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी निवड प्रक्रियेत ४ हजार १९३ बालकांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतही दिडशेहून अधिक बालके आहेत. २० एप्रिलपर्यंत शाळेत जाऊन या बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आले आहे.

मुदतवाढीची मागणी

प्रवेश निश्चितीसाठी केवळ चार दिवस उरले असताना नऊशेपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. सगल चार दिवस सुट्या आल्या आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवसांत प्रवेशात फारशी वाढ होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. तर आपल्या परिसरातील नावाजलेल्या शाळेतच पाल्याला प्रवेश मिळावा, हा अट्टाहास असल्याने प्रवेशांची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT