Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis
Ethanol production from bamboo Latur country first refinery cooperative basis sakal
छत्रपती संभाजीनगर

लातुरात बांबूपासून इथेनॉल निर्मिती, सहकार तत्त्वावर देशातील पहिली रिफायनरी

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देऊ शकेल अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरवर लागवड करणार असून येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर बांबूपासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरु करणार असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता. एक) केली.

लोदगा येथील देशातल्या पहिल्या बांबू टिश्यू कल्चर तयार करणाऱ्या अलमॅक बायोटेक लॅबच्या दुसऱ्या टप्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार आणि या प्रकल्पाचे प्रमुख पाशा पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्ड, औरंगाबादचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या कृषीचं भविष्य बदलवू शकणारा बांबूचा पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्ह्यात सुरू होत असल्याचा आनंद आहे. येत्या काळात शेतकरी फक्त अन्नदाता नव्हे तर ऊर्जा दाता बनणार असल्याच्या देशाचे रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाक्याचा अर्थ येत्या काळात सत्यात उतरू शकतो. त्यामुळे लातूर जिल्ह्यात या वर्षी पाच हजार एकरवर बांबू लागवड करून नजीकच्या काळात सहकार तत्त्वावर देशातली पाहिली रिफायनरी लातूरला उभी करू अशी घोषणा त्यांनी केली. श्री. पटेल ज्या पद्धतीने बांबू मिशनसाठी काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. हे मिशन वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तर देशात बांबूचा ब्रँड म्हणून पाशा पटेल यांची ओळख होत असून आपण त्यांच्या या शेतकरी हिताच्या कामाला मदत करु असे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले. लोदगा येथील अलमॅक बायोटेक लॅब देशात पहिली बांबूवरील टिश्यू कल्चर लॅबरोटरी आहे. आज घडीला एक तासात ५ हजार रोपटे तयार होतात. येत्या काळात या लॅबमधून १५० कोटी रोपे तयार करण्यात येतील आणि ती पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होतील, अशी माहिती श्री. पटेल यांनी दिली.

एअर कार्गोसाठी पाठपुरावा

आज जगभरातील सोयाबीनचे भाव लातूरमध्ये ठरतात हे अभिमानाची बाब आहे. ही सगळी किमया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. येत्या काळात जिल्ह्यात कृषीमध्ये क्रांतिकारक बदल घडून येतील हे ओळखून आपण लातूर विमानतळावर एअर कार्गो, ड्राय इन लॅण्ड पोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे, त्याचा पाठपुरावा सुरु आहे, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT