Hingoli News
Hingoli News 
मराठवाडा

दुष्काळामुळे ८० दिवसच चालणार गळीत हंगाम

पंजाब नवघरे

वसमत (जि. हिंगोली) ः राज्यात ऊस गळीत हंगामाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्य साखर संघाच्या  पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शुक्रवारपासून (ता.२२) राज्यभरातील कारखान्याचे गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात अाला आहे. मात्र, यावर्षी  केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणार असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले. 

राज्यातील ऊस गळीत हंगामाबाबत मंगळवारी आज राजभवनात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, अजित देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. 


या बैठकीत राज्यातील गळीत हंगाम ता. २२ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी श्री. दांडेगावकर यांनी राज्यातील साखर कारखान्यांची परिस्थिती मांडली. कारखान्यांना केंद्र शासनाकडून येणे असलेले सुमारे तेराशे कोटी रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत. तसेच राज्यशासनाने कारखान्यांच्या सॉफ्टलोनचे सुमारे साडेआठशे कोटींचे व्याज दिले नाही. सदर रक्कम कारखान्यांना त्वरीत दिल्यास कारखान्यांना काही प्रमाणात का होईना मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील निर्णय नवीन सरकारच घेईल, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी स्पष्ट केल्याचे श्री. दांडेगावकर यांनी सांगितले. 


राज्यात या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळणे कठीण आहे. त्याचा परिणाम गळीत हंगामावर होणार असून यावर्षी केवळ ८० ते शंभर दिवसच ऊस गाळप करता येणे शक्य होणार असल्याचे श्री. दांडेगावकर यांनी सांगितले. त्यामुळे मागील काही वर्षांत तब्बल दीडशे ते १८० दिवस चालणारे कारखाने आता कमी दिवस चालणार असल्याने त्याचा मजूरांवर देखील परिणाम होणार आहे. कारखान्याच्या विश्वासावर गाव सोडणाऱ्या गावकऱ्यांची यावर्षी तीन महिन्यातच घरवापसी होणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, नवीन मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर राज्याकडून दिल्या जाणाऱ्या सॉफ्टलोनच्या व्याजाच्या बाबतीतल निर्णय घेतला जाणार असल्याने नवीन सरकार कधी स्थापन होणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


वसमत तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र वाढणार
तालुक्यातील पिकांचे परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले आहे. मात्र, परतीच्या पावसाने येलदरी, सिद्धेश्‍वर, इसापूर धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा घेण्यासाठी शेतकरी आता ऊस पिकाकडे वळले आहेत. उसाची लागवडीही करण्यात येत असून उसाचे बेणे विकत घेतले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT