Sanjay Bansode Sakal
मराठवाडा

संवर्धनासाठी प्रत्येकाने पर्यावरणवादी व्हावे - राज्यमंत्री संजय बनसोडे

पर्यावरणातील पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे. प्लॅस्टिकलाही बंदी घातली आहे.

विकास गाढवे

पर्यावरणातील पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे. प्लॅस्टिकलाही बंदी घातली आहे.

उदगीर - पर्यावरणातील पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान हाती घेतले आहे. प्लॅस्टिकलाही बंदी घातली आहे. समाजातील सर्व घटकांनी योगदान दिले तरच पर्यावरण संतुलन घडून येईल. यासाठी प्रत्येकाने पर्यावरणवादी व्हायला हवे, अशी अपेक्षा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

साहित्य संमेलनात शनिवारी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘मराठी साहित्यात निसर्ग चित्रणच आहे, पर्यावरण नाही’ हा या परिसंवादाचा विषय होता. पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. किरण वाघमारे व डॉ. अनिता तिळवे यांनी परिसंवादात आपले विचार मांडले. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, "आता पर्यावरणवादी तज्ज्ञांनी सर्वांसमोर निर्भीडपणे आपले विचार मांडले पाहिजेत. त्यातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ सुरू व्हावी. ऊर्जा धोरणानुसार २०२५ पर्यंत निम्म्या बस विजेवर चालण्याचा निर्धार केला आहे.

श्री. देऊळगावकर म्हणाले, ‘हवामान बदल आवाक्याबाहेर गेला आहे. जंगल नष्ट करण्याचे काम हातात हात घालून होत आहेत. शिक्षा होत नाही तोपर्यंत प्रदूषण कमी होणार नाही. हवामान बदलामुळे दरवर्षी वीस लाख लोकांचा हकनाक बळी जात आहे.’

साहित्यातील निसर्ग चित्रणाचा प्रवास व इतिहास सांगून डॉ. पाटील म्हणाले, की साहित्यात तीन दशकांपासून पर्यावरणाच्या जाणिवा दिसून येत आहेत. साहित्यातील पर्यावरणीय जाणिवा पाहता पर्यावरण सध्या साहित्याच्या मध्यवर्ती ठिकाणी दिसून येते. डॉ. मोरे म्हणाले, की साहित्यात पर्यावरण चित्रणाच्या स्वरूपात दिसून येते. जाणिवाच्या रूपाने ते दिसल्यास ते प्रभावी ठरेल. परिसंवादातील सूचनांचा विचार करण्याची हमी राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली आहे. डॉ. वाघमारे यांनी मराठी साहित्यात निसर्गाला जोडून मांडलेल्या अध्यात्मात पर्यावरण दिसून येत असल्याचे सांगितले. निसर्ग आणि संस्कृतीचा विचार केला तर त्यात पर्यावरण संवर्धन आढळून येईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविकात संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी केले. कृष्णा लवळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लहू वाघमारे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT